पंढरपूर

Rokhthok_Big_Breking_News कोव्हिडं 19 पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय आषाढी एकादशी ; पंढरपूरमध्ये 2 जुलैपर्यंत संचारबंदी

पंढरपूर : पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात येतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या मानाच्या पालख्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. नाकाबंदीही केलेली आहे. गर्दी होऊ नये यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु व्यापारी आणि लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा नवीन प्रस्ताव मान्य केला आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
दरम्यान, या संचारबंदीत सर्व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आल्याचे अतुल झेंडे यांनी सांगितले. तसेच परवानगी असलेल्या पास धारकांना, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांनाही संचारबंदीत सूट असेल, असे ते म्हणाले. तसेच मंदिर प्रदक्षिणा किंवा नगर प्रदक्षिणासाठी पासधारकांशिवाय कोणालाही प्रवेश देणार नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेटिंग केले आहे. याशिवाय शहरात 1200 पोलीस कर्मचारी आणि 800 होमगार्डचा बंदोबस्त ठेवला आहे,असे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x