वटपौर्णिमेच्या दिवशी काळाचा घाला! शेतकरी दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Rokhthok Maharashtra 1 0

वटपौर्णिमेच्या दिवशीच एका शेतकरी पती-पत्नीचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आंबेगाव परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास, भीमा नदीच्या पात्रातील/विहिरीवरील शेतीपंपाची (इलेक्ट्रिक मोटर) लाईट बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे गेले होते. पाऊस आणि ओलावा असल्यामुळे मोटार बंद करताना त्यांना विजेचा तीव्र शॉक लागला आणि ते तिथेच अडकले.
पतीला विजेचा धक्का लागून विव्हळताना पाहून, पत्नी अलका नागणे यांनी स्वतःचा कोणताही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु, विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की त्यांनाही करंट लागला आणि त्याही तिथेच अडकल्या. या हृदयद्रावक घटनेत दोघांचाही जागीच अंत झाला.
वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करण्यापूर्वीच हा काळाचा घाला आल्यामुळे संपूर्ण आंबेगाव आणि पंढरपूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.