राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सोमवार दिनांक २०/०६/२०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकेतर महामंडळ पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या सभेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत राज्यामध्ये एकसारखेपणा असावा व ज्या जिल्ह्यामध्ये पदोन्नती दिली जात नाही त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर १०,२०,३० वर्षाच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या वरच्या श्रेणी बाबत या विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. व याबाबत सभागृहांमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करीन असे बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले.याचबरोबर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा बाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मा. समीर सावंत सर यांना सूचना देण्यात आल्या. या सभेसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचे ओ. एस. डी. विजय बोरसे यांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले अशी माहिती शिक्षकेतर महामंडळाची राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच तोडगा काढू….. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
June 20, 20220

Related Articles
July 8, 20191
देशात ईव्हीएम विषयी साशंकता; विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या – राज ठाकरे यांची मागणी
मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन)
ईव्हीए मशिनमध्ये मोठा घोळ झाला असून, जे ज
Read More
August 15, 20220
खातेवाटपानंतर शिंदे गटातील दादा भुसे नाराज? नॉट रिचेबल झाल्याची चर्चा खातेवाटप मध्ये मनासारखी खाती न मिळाल्याने मुख्यमंत्री शिंदे गटासह भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराला तब्बल ४०
Read More
June 27, 20230
सामाजिक न्याय दिनानिमित्त मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २६
Read More