खर्गे यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं

Rokhthok Maharashtra 2 0

खर्गे यांच्या विधानावरून राजकारण तापलं 🚨
देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्यामुळे
नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
चेन्नईतील पत्रकार परिषदेत बोलताना
खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर
वादग्रस्त टिप्पणी केली.
या विधानानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले—
“अशा प्रकारचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे.
खर्गे यांनी आपले शब्द परत घ्यावेत आणि माफी मागावी.”
👉 तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही
ट्विट करत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
सध्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
🔥 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.