बडे मियां (अमित शहा), छोटे मियां (देवेंद्र फडणवीस) यांनी महाराष्ट्राला दाखवला ठेंगा

Rokhthok Maharashtra 1 0

महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, केवळ नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला म्हणून बिहार व आंध्रप्रदेशवर पैशांचा पाऊस पडत असताना नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला मात्र उपाशीच ठेवले.
बडे मियां अमित शहा व छोटे मियां देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरलं, भाजप सरकार हे भेदावर मार्गक्रमण करणारं सरकार आहे, हाच भेद त्यांनी अर्थसंकल्पातही दाखवून दिला.

 

देशाला सर्वाधिक कर महाराष्ट्र देत असताना अर्थसंकल्पात मात्र महाराष्ट्राचा उल्लेखही करण्यात आलेला नाही, पुणे शहराला एकही नवीन प्रकल्प देण्यात आलेला नाही. पुणे शहराला मंत्रिपद मिळाले, एका पक्षाचे भले झाले, परंतू सामान्य पुणेकरांना काय मिळाले ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अर्थसंकल्पात झालेल्या अन्यायाचा हिशोब पुढील तीनच महिन्यात महाराष्ट्राची जनता मांडणार आहे, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अपमानाची व्याजासह परतफेड होईल ही मला खात्री आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.