पुणे

चित्तरंजन गायकवाड यांची जनसेवा पॅनलला धोबी पछाड,२५२० मताने सरपंच पदाचा दणदणीत विजय

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या “सरपंच पदाच्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी
जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी अडीच हजाराहून
अधिक मतांनी विजय मिळवला आहे. ग्रामपंचायतीच्या
पाच वर्षापुर्वीच्या निवडणुकीत, चित्तरजन गायकवाड
यांच्या पत्नी व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड याही थेट
जनतेतून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या.
सरपंच पदाच्या निवडणुकीत थेट जनतेतुन पत्नीपाठोपाठ
पती विजयी होण्याची केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर
संपुर्ण राज्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता
आहे. यामुळे नवनिर्वाचीत “सरपंच” चित्तरंजन
गायकवाड यांनी राज्यात रेकॉर्डब्रेक कामगीरी केल्याची
चर्चा आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १८)
झालेल्या निवडणुकीत १२८४९ मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावला होता. त्यापैकी चित्तरंजन गायकवाड
यांनी ७६२५ मते घेत, जनसेवा पॅनलच्या सरपंचपदाच्या
उमेदवार व विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर
यांच्या पत्नी, कल्पना काळभोर (५१०५) यांचा तब्बल
२५२० मतांनी पराभाव केला आहे. तर ग्रामपंचायतीच्या
सतरा जागांच्यासाठी निवडणुक पार पडली होती. यातही
चित्तरंजन गायकवाड याच्या नेतृत्वाखालील नवपरीवर्तन
पॅनलने सतरापैकी सोळा जागा त्याही मोठ्या फरकाने
जिंकत कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डब्रेक
कामगीरी केली आहे. चित्तरंजन गायकवाड यांच्या
विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जनसेवा
पॅनेलला अवध्या एका जागेवर समाधान माणावे लागले
आहे. जनसेवा पॅनलचे प्रमुख नंदकुमार काळभोर हे स्वत
या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
दरम्यान कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या
सरपंचपदासाठी थेट जनतेतुन मतदान झाले. यात
चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांना सहा प्रभागातून (
१५५५+ ६१९ +६७६ +९२५+ १६७७ +२१७३)
७६२५ एवढी मते मिळाली. तर चित्तरंजन गायकवाड यांच्या विरोधात सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कल्पना काळभोर यांना सहा प्रभागातून मिळुन (८२६७८५४२२९१२१२५० + २०१०) ५१०५ मते मिळाली. यामुळे चित्तरंजन गायकवाड यांचा तब्बल २५२० मतांनी विजयी झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
दरम्यान चित्तरंजन गायकवाड यांच्या विजयाची
कारणे……
चित्तरंजन गायकवाड यांचे एकखांबी, निर्णायक
नेतृत्वामुळे हे निर्विवाद विजयी वर्चस्व स्थापन करता आले. वेळप्रसंगी आक्रमक, संयमी, सर्वसामान्यांना ऑनलाईन व ऑफलाईन, २४ तास सहज उपलब्ध होणा-या नेतृत्वाखालील नवपरिवर्तन पॅनेलने या निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी केली. तसेच चित्तरंजन गायकवाड यांनी मिळवलेला विजय व त्यांना मिळालेली मते पहाता, चित्तरंजन गायकवाड यांनी मागील पाच वर्षात केलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे, निवडणूकीचे गेली पाच वर्षे चाललेले उत्कृष्ट नियोजन व विरोधकांच्या प्रश्नांना दिलेली सडेतोड बिनजोड उत्तरे या सर्वांचा परिपाक म्हणजेच आजचा
निवडणूक निकाल आहे. निकाला नंतर ‘हा निकाल
अपेक्षितच होता” अशी प्रतिक्रिया मतदारांच्या बरोबर
सर्वसामान्य नागरीकांच्यात उमटली आहे.
प्रभागनिहाय उमेदवारांची नावे (कंसात मिळालेली मते व विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे)
*प्रभाग क्रमांक १ नवपरीवर्तन प्रनेल*
आकाश धनंजयकाळभोर (२३८१ विजयी), सिमिता अंगदराव लोढ(१३८५ विजयी) व कोमल सुहास काळभोर (१५२९विजयी), विशाल विठ्ठल गुजर (१००२ पराभुत), नेहा
बाबासाहेब चव्हाण (९५९ पराभूत), अर्चना हेमंत टिळेकर(८२९ पराभुत)
*प्रभाग क्रमांक २ नवपरिवर्तन पॅनल*
बिना तुषारकाळभोर (७८८ विजयी), मंदाकिनी सूर्यकांत नामुगडे(८२४ विजयी), राजश्री उदय काळभोर (७१०-विजयी),जनसेवा पॅनल रेश्मा नंदकुमार काळभोर (६१२),
शीतल नितेश लोखंडे (६६४), स्मिता निलेश काळभोर(६८२)
*प्रभाग क्रमांक ३ नवपरिवर्तन पॅनल*
दीपक नवनाथअढाळे (६६९ विजयी), सुनंदा देविदास काळभोर(७०९ विजयी), जनसेवा पॅनल शहाजी कांतीलाल मिसाळ (४२१), संगीता राजाराम दळवी (३९०)
*प्रभाग क्रमांक ४ नवपरिवर्तन पॅनल*
रुपाली सतीशकाळभोर (१०४५ विजयी), नासीरखान मनुलाखानपठाण (१६२ विजयी), अभिजित रामदास बडदे (९५९),जनसेवा पॅनेल नंदू कैलास काळभोर (१०८५विजयी),बिस्मिला शमी शेख (७३३), दत्तात्रय भिमराव वाघमारे (६७४)
– *प्रभाग क्रमांक ५ नवपरिवर्तन पॅनल*
स्वप्नील शिवाजीकदम (१५१७ -विजयी), अविनाश विजय बडदे (१४९८-विजयी), सोनाबाई अशोक शिंदे (१४४६ विजयी),जनसेवा पॅनेल स्मिता गुरुदत्त काळभोर (१३५४) मयूर सुरेश कदम (१३७०), अमित वसंत कदम (१२६२)
*प्रभाग क्रमांक ६ नवपरिवर्तन पॅनल*
योगेशभाऊराव मिसाळ (१८१६ विजयी), सलीमा कलंदर पठाण (१८५१ – विजयी), राणी प्रितम गायकवाड (१८९५-विजयी), जनसेवा पॅनेल श्रीकांत नारायण भिसे(८२८), अर्चना श्रीकांत कदम (१२८६), मनीषा राजेशकाळभोर (१२६१), स्वतंत्र रुपाली अविनाश कोरे(४३०)