MPSC विद्यार्थ्यांचा संताप! पेपरफुटीला आळा घाला, पारदर्शक परीक्षा घ्या; विद्यार्थ्यांची आयोगाकडे जोरदार मागणी

Rokhthok Maharashtra 6 0

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनात सध्या परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. पेपरफुटी, परीक्षा पेपर आधीच उपलब्ध होणे किंवा पैशांच्या माध्यमातून परीक्षेच्या प्रक्रियेत गैरप्रकार होण्याच्या शक्यतेमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/Dcvo5hkBcMy/

स्पर्धा परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या मेहनत, ज्ञान आणि गुणवत्तेच्या आधारावरच पार पडली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची ठाम भूमिका आहे. अनेक विद्यार्थी अनेक महिने नव्हे तर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र काही व्यक्ती गैरमार्गाचा अवलंब करून पुढे जात असतील, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर हा मोठा अन्याय ठरू शकतो.पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा यंत्रणेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कडक सुरक्षा व्यवस्था आणि अधिक पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/Dcvn8V6tN7d/

तसेच परीक्षेतील कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार समोर आल्यास संबंधितांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी आहे.विद्यार्थ्यांच्या मते, पैशांच्या जोरावर किंवा गैरमार्गाने अधिकारीपद मिळवणाऱ्या व्यक्ती केवळ एका विद्यार्थ्याचे नुकसान करत नाहीत, तर भविष्यात प्रशासनामध्ये अयोग्य व्यक्ती पोहोचण्याचा धोका निर्माण करतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नसून संपूर्ण प्रशासनाच्या गुणवत्तेशी आणि देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DcvaCi2Od-Z/

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शासनाने या गंभीर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणावी, पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात आणि प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DcvZYHwJlzJ/

मेहनत आमची… परीक्षा आमची…
मग निकालही गुणवत्तेवरच हवा!

विद्यार्थ्यांच्या या मागणीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शासन आता कोणती भूमिका घेणार? याकडे हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.