पुणे

पुणे व पिंपरी चिंचवड येथील आगीच्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू, मोठा अनर्थ अग्निशामक दलामुळे टळला..!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे : पुणे येथील वाघोली या ठिकाणी एका सिलेंडरच्या गोडाऊनला भीषण आग लागली, यामुळे एकच खळबळ उडाली, लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला, तसेच पिंपरी- चिंचवडमध्येही एका खासगी बँकेला आग लागल्यामुळे या आगीत बँकेतील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले, कदाचित जर लवकर अग्निशामक दलाची मदत मिळाली नसती तर फार भयानक परिस्थिती निर्माण झाली असती असे सांगण्यात येते, परंतु वेळेत मदत मिळाली त्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आग वीजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जर मदत वेळेत मिळाली नसती तर कदाचित पुणे शहर ४०० सिलेंडरच्या स्फोटाने हादरले असते, वाघोली येथे लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला असे नागरिकांनी सांगितले, वाघोली येथे रात्री साधारण ११.४५ वा. सुमारास उबाळे नगर याठिकाणी सिलेंडरच्या गोडाउनला भीषण आग लागली, या आगीत गोडाऊनमध्ये असलेले ४ सिलेंडर फुटले, आग लागल्यानंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए च्या ४ अशा एकूण ९ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागल्यामुळे या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, शेजारी ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते, त्या ठिकाणांपर्यंत आग जाऊ नये, यासाठी जवानांनी योग्य असे नियोजन केल्यामुळे आग जास्त न पसरू देता विजवली गेली, त्यामुळे पुढील मोठा धोका टळला, अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे शहर हादरले असते, असे पोलिसांनी सांगितले, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग वेळेत आटोक्यात आणल्यामुळे जवानांचे कौतुक केले जात आहे, परंतु जवानांनी तीन लोकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली.