महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. ही माहिती एका सोशल मीडिया पोस्टमधून समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
या कथित भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, याचा संबंध विधान परिषद निवडणुकीशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते, ही निवडणूक तितकी गुंतागुंतीची नसून, केवळ या कारणासाठी एवढ्या मोठ्या नेत्यांची भेट होणं शक्यतांवर प्रश्न उपस्थित करते.
तसेच, ही भेट झालीच असेल तर त्यामागे व्यापक राजकीय समीकरणे आणि भविष्यातील घडामोडी दडलेल्या असू शकतात, असंही मत व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, या चर्चांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसून, प्रत्यक्षात अशी भेट झाली का आणि तिचं कारण काय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
