पुणे

विद्यार्थ्यांसाठी अपघाती विमा सक्तीचा होणार? | मोठी मागणी सरकारपर्यंत पोहोचली!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठी मागणी पुढे आली आहे!
रयत विद्यार्थी विचार मंचाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष Akshay Chavan यांनी विद्यार्थ्यांसाठी अपघाती विमा सक्तीचा करण्याची जोरदार मागणी केली आहे.
👉 २५ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी कराड दक्षिणचे आमदार Atul Bhosale यांना निवेदन दिलं होतं…
आणि आता या मागणीचा पाठपुरावा जोरात सुरू आहे!
👉 आमदार भोसले यांनीही या विषयाची गंभीर दखल घेत
थेट मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र पाठवलं आहे.

📌 प्रश्न गंभीर आहे —
दरवर्षी शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या अपघातांच्या घटना वाढत आहेत…
अनेकांना जीव गमवावा लागतो…
आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर संकट कोसळतं!
👉 मग जबाबदारी कोणाची?
⚠️ मागणी स्पष्ट आहे —
शैक्षणिक प्रवेशासोबतच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी
अपघाती विमा सक्तीचा करा!
👉 या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
पालक आणि विद्यार्थी वर्गातून या मागणीला मोठा पाठिंबा मिळतोय.
🔴 आता सगळ्यांची नजर सरकारच्या निर्णयाकडे —
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विमा योजना कधी लागू होणार?