छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत कठोर इशारा दिला आहे. “शिवछत्रपतींचा अवमान सहन केला जाणार नाही. संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्रात बंदी घालावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, “यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित वक्तव्याबाबत आता पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
