“पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.
सहा वर्षांच्या चिमुरडीसह 70 वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी सावत्र आजोबाला अटक करण्यात आली आहे.
धनश्री केदारी आणि मंगल शिंदे अशी मृतांची नावे आहेत.
आरोपी विनायक भवारी याने वैयक्तिक वादातून हे कृत्य केल्याचा संशय आहे.
माहितीनुसार, घरातील मतभेद आणि संशयातून आरोपीने प्रथम वृद्ध महिलेवर हल्ला केला आणि त्यानंतर ओळख पटू नये म्हणून चिमुरडीचा जीव घेतला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आळेफाटा येथून त्याला अटक केली.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.”
