कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊन नंतर गोव्यात देशी-परदेशी पर्यटकांना प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत गोव्यातील पर्यटन व्यवसाय सुरु करण्यावर चर्चा झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं आजगावकर यांनी सांगितलं.
आजगावकर म्हणाले, गोव्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने उद्यापासून पर्यटन खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे. पण यासाठी काही अटी असणार आहे, पर्यटकांना निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करावे लागेल किंवा गोव्यात आल्यानंतर कोरोना संसर्ग टेस्ट करावी लागेल. आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच पर्यटकांना इतरत्र फिरू देण्यात येईल. सध्या गोव्यात पाऊस सुरु झाला आहे. २० मार्चपासून गोव्यात पर्यटन बंद आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत होते. अशा स्थितीत स्थानिक व्यावसायिकांनी हॉटेल सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, याला पर्यटकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल.
