पुणे

“भोसरीकरांचा एकच निर्धार, आढळराव पाटील पुन्हा खासदार… “शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भोसरी दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन प्रतिनिधी )

भोसरी दौऱ्या दरम्यान लांडेवाडी रोड येथे माजी आमदार विलासशेठ लांडे पाटील यांच्या निवासस्थानी महायुती उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. लांडे परिवार कडून स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी आढळराव पाटील यांना निवडून आणणार असा निर्धार भोसरीकरांनी केला.

यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गव्हाणे, पुणे नियोजन समिती विष्णू फुगे, नगरसेवक भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक विक्रम लांडे, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव, माजी स्वीकृत नगरसेवक नंदकुमार शिंदे, युवा नेते विशाल लांडगे, खंडोबा मित्र मंडळ अध्यक्ष भोसरी अविनाश शिंदे, अपूर्व आढळराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे, समन्वयक महायुती दत्तात्रय भालेराव, शिवसेना समन्वयक विशाल लांडगे, शिवसेना समन्वयक आबा लांडगे, आरपीआय मातंग आघाडी अध्यक्ष स्वप्निल कांबळे, उपाध्यक्ष रमेश गजरमल कोषाध्यक्ष रमेश शिंगारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष लीलाताई ठोसर, सरचिटणीस सचिन डेढे, शहराध्यक्ष अश्विन खुडे, प्रवक्ते भारत बनसोडे, कार्याध्यक्ष लिमराज कांबळे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भोसरी दौऱ्यात चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो संवाद सभेला आढळराव पाटील यांनी उपस्थिती लावली.
प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती प्रियाताई लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपस्थिती होती. गाथा काँलनी, अभंग विश्व फेज सोसायटी, मिरर आरकेट, गव्हारे आंगण, ग्लोरिया, साई मांगल्य, हरि प्रिया हाईट्स येथिल सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले नमो संवाद संकल्पना ही गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या महत्त्वपूर्ण योजना राबवली गेल्या याचा ऊहापोह मांडण्यासाठी सुरू केला आहे. आणि या उपक्रमाला जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आमदार महेश लांडगे यांनी दहा वर्षात केलेली कामे दमदार ठरली. नरेंद्र मोदी यांच्याशी फार जवळून काम करण्याची मला संधी मिळाली. दरम्यान मी अनुभवलं 2014 अगोदरचा आपला देश आणि त्यानंतरचा आपला देश यात फार फरक आता आपल्याला दिसत आहे. 370 चा निर्णय असेल, तितका धाडसी निर्णय घेण्याची क्षमता कुठल्याच नेत्यांमध्ये नसेल. आत्ताच्या योजना हे जनतेमधील सर्वसामान्य पर्यंत पोहोचणारे आहेत. 13 लाख 38 हजार घरांमध्ये पाणी पोहोचवलं आहे शिरूर मतदारसंघात नळाच्या माध्यमातून. मोदीजींना अमलात आणलेल्या पीएम किसान योजना शेतकऱ्यांच्या थेट खात्यांमध्ये पैसे जातात पुढील पाच वर्षातही या योजना लागू राहणार आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. असेही त्यांनी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुके, शिवसेना उपनेतेे इरफान सय्यद, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव, नगरसेवक अंकुश मळेकर, नगरसेवक संतोष मोरे, माजी नगरसेवक सुरेश तात्या मैत्रे, भाजप उपाध्यक्ष किसन शेठ बावरकर, भाजप महिला पिंपरी चिंचवड सरचिटणीस सोनम ताई मोरे, समाजसेवक अंकुश माळेकर, युवा नेते विनायक आबा मोरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.