Uncategorizedपुणे

भीमा कोरेगाव, पेरणे फाटा येथील विजयीस्तंभास अभिवादानासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या भीम अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे; भीमा कोरेगाव, पेरणे फाटा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत,पुणे विधानभवन येथे कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ही सूचना करण्यात आली.

या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव,पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यभरातून फार मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी विजयी स्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी,तसेच पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी, अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात, (ग्रामीण मार्ग क्रमांक ४), राज्य मार्ग ११८ लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता करणे (ग्रामीण मार्ग क्रमांक ५), पुणे नगर रोड ते प्रजिमा २९ या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील असे ही त्यांनी सांगितले.

सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले, सोहळ्याच्या नियोजनासाठी आवश्यक सर्व निधी शासनातर्फे देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले, कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या आहेत, नियोजनाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.

कोरोनाच्या काळानंतर नंतर प्रथमच यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता १६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आले आहे,सिटी बसेस १००, तात्पुरती स्वच्छतागृहे १४००, तसेच २० रुग्णवाहिका व आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने आदी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली, सोहळ्यासाठी पोलीस विभागातर्फे आवश्यक बंदोबस्ताचे व वाहतूक विषयक नियोजन करण्यात येत असल्याचे कर्णिक यांनी सांगितले, बैठकीला विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.