देशासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहत असल्याचे संकेत देत पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना मोठं आवाहन केलं आहे.
हैदराबादमधील सभेत मोदींनी पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळा… पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा… आणि शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमवर भर द्या, असं सांगितलं. �
यासोबतच परदेशी प्रवास टाळा, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा, परकीय वस्तूंची खरेदी कमी करा आणि परकीय चलन वाचवा, अशीही आवाहनं करण्यात आली. �
इराण-अमेरिका संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि वाढते कच्च्या तेलाचे दर यामुळे भारतावर आर्थिक दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. �
मोदींच्या या आवाहनानंतर देशात पुढे नेमकं काय घडणार? महागाई आणखी वाढणार का? आणि सर्वसामान्यांच्या खिशावर याचा किती परिणाम होणार? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
