कोल्हापूर (प्रतिनिधी – राम जाधव )
यावर्षी कोल्हापूर येथे अतिवृष्टी मुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आला आणि सर्व नागरिक बेघर झाले. जनावरे सुद्धा महापुरामध्ये वाहून जाऊन ते मृत पावले.अश्यातच पूरग्रस्त नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आणि तत्यांना मदतीची गरज होती.
तसेच महाराष्ट्र मधून प्रत्येक जिल्ह्यातून पूरग्रस्तांना मदत मिळत आहे.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय सेनेच्या पुणे शहर महिला अध्यक्ष सौ.पुजाताई साठे आणि त्यांचे सहकारी यांनी 2 दिवस कोल्हापूर मधील नायगाव, शिरोली, रामनगर, शियेगाव,माळवाडी, गोसावी वस्ती आणि हौशिंग सोसायटी मध्ये राहून तेथील परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांना धीर देत पूरग्रस्त नागरिकांना धान्य, कपडे, आणि बिस्कीट तसेच खाण्यापिण्याच्या वस्तू मदत म्हणून पूरग्रस्तांना मदत केली.
तेथील नागरिकांनी पूजा साठे व त्यांच्या सहकार्याचे आभार व्यक्त केले.
अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

Related tags :
You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!